Sunday, December 7, 2014

१३४ पाणी हे जीवन आहे

                                      १३४   पाणी हे जीवन आहे

आज जलसंपत्ती दिन आहे. जल म्हणजे जीवन.
माणसाच्या जीवनाशी निगडीत पंचमहाभूतांपैकी पहिले दैवत.
आप,पाणी,नीर,तोय,उदक जवळ जवळ ७० प्रतिशब्द संस्कृत मध्ये सापडतील.
एवढे महत्वाचे दैवत पाणी आहे. त्याचा जपून वापर केला पाहिजे.

पूर्वी सरकारने गावोगावी सार्वजनिक नळ बसविले होते.
प्रतिष्ठितानी त्यांना पाईप लावून कवाथे शिंपणे,गाड्या धुणे वगैरे उद्योग सुरु केले.
शेजारणीची लक्तरे सार्वजनिक नळावर धुताना,
कळशी भरून वाहतेय याचे भान महिलांनी कुठे ठेवले ?
परिणामी सरकारने कनेक्शन व भंगारवाल्यांनी नळ नेल्यावर,
कोन्क्रीटचे खांब तेवढे शिल्लक राहिले.

कॉंग्रेसचे अधिवेशन अलाहाबादला भरले होते.
दुपारचे जेवण झाले. गांधीजी हात धुवायला उठले.
मंडपाबाहेर पाण्याची बादली ठेवली होती.
नेहरूंनी गांधीजींच्या हातावर भस्स करून पाणी  ओतले.
गांधीजी म्हणाले, " पाणी जपून वापरावे. "

नेहरूंनी समोर बघितले. गंगा दुथडी भरून वाहत होती.
गांधीजी हसले. ते म्हणाले, " पाणी वापरले कि संपते. पाणी हे जीवन आहे. "
भविष्य काळाचा किती अचूक वेध घेतला होता महात्मा गांधीनी !

No comments:

Post a Comment