Saturday, March 16, 2013

कथा विवेकानंद २७

                            २ ७ . अद्वैत सिद्धांत !

     स्वामी रामकृष्णाकडे नरेंद्र यायला लागला . ते त्याला अध्यात्मिक ज्ञान द्यायला लागले . आद्य शंकराचाऱ्यांचा अद्वैत सिद्धांत सांगताना ते म्हणाले, ' बघ हे सगळे जग ब्रह्ममय आहे . मी, तू ,झाडेच काय हे दगड सुद्धा ब्रह्म आहे . ' नरेंद्राचा विश्वास बसला नाही . 
     खोलीतून बाहेर आल्यावर त्याची मित्रांसमवेत थट्टा सुरु झाली . हा तांब्या ब्रह्म , हा खांब ब्रह्म , ब्रह्म , ब्रह्म !
     रामकृष्ण त्यांची हि थट्टा मस्करी ऐकत होते . ते बाहेर आले . नरेंद्रच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले , ' काय चाललेय ! मलाही ऐकवा ना ? '
    नरेंद्राला काय झाले काहीच कळले नाही . काही तरी झालेय नक्की .  दोन दिवस नरेंद्र सगळीकडे ब्रह्मच बघत होता . खाणे ब्रह्म, पिणे ब्रह्म, चालणे ब्रह्म, बसणे ब्रह्म ! 
     चारेक दिवसांनी रामकृष्ण म्हणाले, ' काय नरेन, समजला का शंकरचार्यांचा अद्वैत सिद्धांत ! '

No comments:

Post a Comment