Saturday, March 23, 2013

कथा विवेकानंद २९

                  २९ मला समाधी  हवीय !

     ' मला परमेश्वर भेटला पाहिजे ' नरेंद्रच्या मनातील  एकमेव विचार. रात्रंदिवस तो परमेश्वराचे चिंतन करी . अभ्यास करताना सुद्धा तो साधनेचा  विचार करे . स्वामी रामकृष्ण आजारी होते . प्रकृती उपचारांना दाद देत नव्हती . 
     नरेंद्रच्या मनात समाधीचा विचार पुन्हा तीव्र झाला . गुरुजींकडे जायलाच हवे . बाहेर पाऊस पडत होता . कोसळत्या त्या पावसाची पर्वा  न करता नरेंद्र स्वामींकडे जायला लागला . 
    नखशिखांत भिजलेला नरेंद्र  स्वामींकडे आला . ' मला निर्विकल्प समाधी  हवीय . '
     रामकृष्ण म्हणाले , ' देईन ना .सावकाश शिकवीन .  '
     नरेंद्र म्हणाला , ' आणि तुमचा आजार वाढला तर . '
     रामकृष्ण क्षणभर गप्प राहिले . हळूहळू ते बोलू लागले . साधनेसंबंधी सांगू लागले . नरेंद्र त्याप्रमाणे करू लागला . त्याला आपल्या शरीरात घडणारे बदल जाणवू लागले . प्रयोग करायचा काय ?
     शिष्य काली जवळच होता . नरेंद्रने त्याला स्पर्श केला . कालीच्या सर्वांगातून वीज निघून गेली . काय घडलेय ते रामकृश्नांच्या लक्षात आले . 
ते नरेंद्राला म्हणाले , " अरे आता कुठे मिळवायला लागलास . आणि लागलीच उधळपट्टी सुरु ? "


No comments:

Post a Comment