Saturday, March 9, 2013

कथा विवेकानंद २५

                २५.ईश्वरत्वाची जाणीव !

     देव आहे का ? या नरेंद्रच्या प्रश्नाला स्वामी रामकृष्णांनी ' होय ' असे स्पष्ट उत्तर दिले होते . रामकृष्णांना एकदा भेटलेच पाहिजे . तो दक्षिणेश्वरला निघाला . 
     नरेनला पाहताच रामकृष्णांना आनंद झाला . ते त्याच्याशी गप्पागोष्टी करू लागले . बोलत असताना रामकृष्णाना जाणवले नरेंद्राचा देवावरील विश्वास दृढ झालेला नाहीये . याला जाणीव करून द्यायला हवीय . 
     रामकृष्णानी आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने नरेंद्राला स्पर्श केला . क्षणकाल काय झाले नरेंद्राला समजलेच नाही . सगळे जग आपल्याभोवती फिरत आहे, आपण कोठेतरी शून्यात विलीन होत आहोत असे त्याला वाटू लागले . तो विस्मित झाला . 
     रामकृष्णांनी स्पर्श मागे घेतला . सगळे पूर्ववत झाले . नोरेन भानावर आला . एका नव्या विश्वाची जाणीव त्याला झाली होती . 

No comments:

Post a Comment