Sunday, February 2, 2025

१५६ भारत हा सत्यधर्माचा सागर

                                 १५६   भारत हा सत्यधर्माचा सागर



भारतावर इंग्रजांचे राज्य सुरु झाले

हे राज्य दीर्घ काळ करायचे असेल तर इथे धर्मांतर करायला हवे

मोठ्या प्रमाणात मिशनरी ब्रिगेड्स भारतात आणण्यात आल्या

रेव्हरंड आवर पुण्यात आले, धर्मांतराचा धडाका सुरु झाला

लोक सैतानाच्या तावडीतून भराभर मुक्त होऊ लागले

 

मुळावरच घाव घालू , पुण्यातील एका विद्वानाच्या घरी आवर गेले,

पाश्चिमात्यांची स्तुती पौर्वात्यांची निंदा त्यांनी सुरु केली

थोडा वेळ जाऊ दिल्यावर पुण्याचे विद्वान म्हणाले

" आपण इथल्या संतसाहित्याचा अभ्यास केलाय का ?

आपल्याला मराठी येते का ?

ती थोडी शिकून घ्या ! नंतर बोलू आपण "

 

आवर मराठी शिकले, संतसाहित्याचा अभ्यास करू लागले !

आकाशातल्या बापदूतांच्या प्रमुखांना पत्र लिहिलेय त्यांनी

' भारत हा सत्यधर्माचा सागर आहे, इथे कसले मिशनरी धाडतां !

त्यांची खरी गरज ख्रिश्चनांनाच आहे '

आपली जीवनभराची कमाई, आठ लाख रुपये त्यांनी,

भारतीय संशोधन मंडळाला देऊन टाकले !

No comments:

Post a Comment