Thursday, July 18, 2013

७६ . इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स

                   कथा विवेकानंद - ७६ 

     स्वामीजी सर्वधर्मपरिषदेत भाग घेण्यासाठी जलयानाने शिकागोला जात होते . जपान सोडल्यानंतर त्यांचा परिचय श्री . जमशेटजी टाटांशी झाला . दोघेही उगवत्या भारताची स्वप्ने पाहणारे . तार जुळली नाही तर नवलच !
     विश्वदिग्विजय करून, युरोपात तीन वर्षे वेदांताचा प्रसार करून स्वामीजी भारतात परतले . ते परतल्यावर श्री . टाटांनी त्यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रावर पत्रोत्तर म्हणून स्वामीजींनी ' प्रबुद्ध भारत ' या आपल्या मासिकात ' श्री . टाटा यांची योजना ' या नावाचा लेख लिहिला . 
     त्यांनी लिहिलेय, ' आज शेती व व्यापार या क्षेत्रात आधुनिकता आणली पाहिजे . यात आधुनिक विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे . आजपर्यंतच्या या सर्वात महान कार्यात टाटाच्या खांद्याला खांदा लावून सर्वांनी उभे राहिले पाहिजे . धनसमर्पण केले पाहिजे . 
     याचा परिपाक म्हणजे आज बंगळूरूला उभी असलेली संस्था ' इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स . ' संपूर्ण आग्नेय आशियात इंजीनियरिंग व औद्योगिक शिक्षण देणारी तसेच संशोधन करणारी प्रमुख संस्था . मोठमोठे अभियंते भारताला याच संस्थेने दिले .  

No comments:

Post a Comment