Sunday, July 21, 2013

८१ . तिखट मिरच्या मिळतील काय ?

                         कथा विवेकानंद - ८१ 

     स्वामी विवेकानंद संन्याशी होते . ते स्वतःला परमहंस म्हणत . सगळे सोडून दिलेला संन्याशी नव्हे . स्वतः जवळ काहीही न बाळगणारा अपरिग्रही साधू  . स्वामीजी वेगवेगळ्या पदार्थांचे शौकीन होते . पदार्थ ते मोठ्या आवडीने खात . मसालेदार पदार्थ त्यांची आवड होती . 
   स्वामीजी नुसते स्वतः खात नसत . गुरुबंधुना, शिष्यांना वाढण्यात त्यांना मोठा आनंद मिळत असे . स्वामीजी विविध पदार्थ आपण तयार करीत . पदार्थाचे, त्यातील गुणवैशिष्ट्यांचे वर्णन करीत शिष्यांना वाढीत . जे मिळेल ते साधूने खाल्ले पाहिजे . दात्याने वाढलेली भिक्षा स्वीकारलीच पाहिजे असे ते सांगत . 
     स्वामीजी स्वीत्झर्लंड मध्ये होते . मिरच्यांच्या तिखट पणाविषयी चर्चा सुरु झाली . मिरच्या आणण्यात आल्या . स्वामीजी त्या तिखटजाळ मिरच्या मोठ्या चवीने खाऊ लागले . चावून चावून त्यांचा आस्वाद घेऊ लागले . म्हणाले, ' यापेक्षा तिखट मिरच्या इथे मिळतील काय ? '  
     


No comments:

Post a Comment