Monday, July 29, 2013

९ १ . संन्याशाने एका जागी राहू नये .

                       कथा विवेकानंद - ९ १

     बेळगावच्या मुक्कामात स्वामीजींचा निवास भाटे वकिलांकडे होता . श्री . हरिपद मित्रांनी मोठ्या प्रयासांनी त्यांना आपल्या घरी आणले . धर्म, साहित्य, शिक्षण, मिशनरी प्रचार यावर सखोल चर्चा त्यांच्याकडे केली . स्वामीजींनी पुढील प्रवासास निघायचा विषय काढला . हरिपद सोडायला तयार होईनात . 
     स्वामीजी म्हणाले, ' संन्याशाने शहरात तीन दिवसांपेक्षा जास्त राहू नये . खेड्यात तर एकच दिवस . बेळगांव शहर असल्याने आता मला निघायला हवे . खूप दिवस झालेत . ' 
     हरिपद कसेच ऐकायला तयार होईनात . स्वामीजी म्हणाले, ' संन्याशी सगळेच त्याग करतो . स्वतःचे श्राद्ध सुद्धा करतो . त्याला मोह उत्पन्न होता कामा नये . या मायावी संसाराची माया निर्माण होता उपयोगी नाही . ' 





No comments:

Post a Comment