Wednesday, July 31, 2013

९४. ख्रिश्चनांवर विजय .

                      कथा विवेकानंद - ९४

     गोव्याला येण्यामागे  स्वामीजींच्या डोळ्यासमोर दोन  प्रमुख उद्देश्य   होते. पहिला देवदर्शन ! दक्षिण काशीतल्या देवतांचे दर्शन ! आणि दुसरा ख्रिश्चन मताचा अभ्यास! खंडन-मंडण यांची फार मोठी परंपरालाभलेल्या या देशात परमताचा विचारअभ्यास सहज केला जातो.
  स्वामीजी हाच प्रमुख उद्देश्य घेऊन गोव्यात आले होते. श्री. सुब्रायबाब नायकांशी आपला मानस त्यांनी  व्यक्त  केला. मडगाव पासून  किमी. अंतरावर  असलेल्या प्राचीन रायतूर किल्ल्याचे रुपांतर पोर्तुगीजांनी सेमिनारीत केले होते.  ख्रिश्चन मतप्रसार करणारे पंथप्रसारकपाद्री तेथे तयार केले जातात. तिथल्या ग्रंथालयात ख्रिस्ती पंथविषयक अनेक उत्तमोत्तम पुस्तके होती . अत्यंत दुर्लभ  अशी  प्राचीन  हस्तलिखिते होती. लेटीन ग्रंथ होते. या पुरातन  ग्रंथांमधून ख्रिश्चन पंथाचा इतिहास व तत्वज्ञान यांचा अभ्यास  करणे. गोव्यातील समाजमनावर  झालेला धर्मपरिवर्तनाचा प्रभाव जाणून घेणे आणि सात  किलोमिटरवर  जावून  मिळविलेल्या  माहितीच्या  आधारे  सात  समुद्रापलीकडे जाऊन अर्वाचीन हिदुत्वाची आश्वासक  सिंहगर्जना  करणे.
     स्वामीजी रायतूरला गेले. तिथल्या प्राचीन ग्रंथांचे ते अध्ययन करू लागले. हस्तलिखिते चाळू लागले. काही टिपणेही त्यांनी काढली. तेथील विद्यार्थीशिक्षकपादरीत्यांचे प्रमुख स्वामीजींना कुतुहलाने बघत. फुरसतीच्या वेळी त्यांच्याबरोबर वार्तालाप करीत. विविध प्रश्न विचारीत. स्वामीजीची वेशभूषाप्रगाढ ज्ञानतीव्र स्मरणशक्तीचौफेर व्यासंग यामुळे लोखंडाने चुंबकाला चिकटावे तसे सर्वजण आकर्षिले जात. शेकडो विद्यार्थी तिथे निवासाला असत. येशूच्या धर्माचे सार त्यांनी या विद्यार्थ्यासमोर ठेवले. एक भगवा संन्यासी येतो काय ! चारदोन पुस्तके चाळतो काय ! आणि वर्षानुवर्षे पंथ कोळून प्यालेल्याना त्यांच्याच पंथाचे मर्म सांगतो काय ! 

No comments:

Post a Comment