कथा विवेकानंद - ७९
स्वामीजी एका सदगृहस्थाच्या घरी मुक्कामाला होते . वर्तमानपत्रात बातमी आली होती . ' कोलकात्यात एक माणूस उपासमारीने मेला . ' बातमी वाचताच स्वामीजी अस्वस्थ झाले . ते एकदम म्हणाले, ' हा देश रसातळाला जाणार . '
' असे आपण का म्हणता ? ' श्री. हरीपदांनी विचारले .
अरे, इतर देश आणि आपला देश यांच्यात फरक आहे . इतर देशात गरिबांना अन्न देणाऱ्या, काम देणाऱ्या अनेक संस्था आहेत . अनाथाश्रमांना लोक भरपूर पैसे देतात . आणि तरीही तिथे शेकडो लोक भुकेने मरत असतात .
आपल्या देशात तसे नाही . आपल्या देशात भुकेलेल्या माणसाला अन्न देण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून आहे . त्यामुळे येथे कोणी उपाशीपोटी मरत नसत . आज अशी बातमी प्रथमच वाचली . आणि महत्वाचे म्हणजे या दिवसात दुष्काळही नाही . आपण आपली संस्कृती, आपला वारसा विसरून चाललोत काय ?
स्वामीजी एका सदगृहस्थाच्या घरी मुक्कामाला होते . वर्तमानपत्रात बातमी आली होती . ' कोलकात्यात एक माणूस उपासमारीने मेला . ' बातमी वाचताच स्वामीजी अस्वस्थ झाले . ते एकदम म्हणाले, ' हा देश रसातळाला जाणार . '
' असे आपण का म्हणता ? ' श्री. हरीपदांनी विचारले .
अरे, इतर देश आणि आपला देश यांच्यात फरक आहे . इतर देशात गरिबांना अन्न देणाऱ्या, काम देणाऱ्या अनेक संस्था आहेत . अनाथाश्रमांना लोक भरपूर पैसे देतात . आणि तरीही तिथे शेकडो लोक भुकेने मरत असतात .
आपल्या देशात तसे नाही . आपल्या देशात भुकेलेल्या माणसाला अन्न देण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून आहे . त्यामुळे येथे कोणी उपाशीपोटी मरत नसत . आज अशी बातमी प्रथमच वाचली . आणि महत्वाचे म्हणजे या दिवसात दुष्काळही नाही . आपण आपली संस्कृती, आपला वारसा विसरून चाललोत काय ?
No comments:
Post a Comment