Friday, July 19, 2013

७८ . जनता जनार्दनाच्या सेवेसाठी

                    कथा विवेकानंद - ७८

     स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माला सेवेचा स्पर्श दिला . आपल्या शिष्यांना त्यांनी जनसेवेचे व्रत दिले . त्यांच्यात सेवाभाव जागविला . सेवाभावी संस्थांची उभारणी केली .  त्या वाढविल्या . 
     भगवान गौतम बुद्ध त्यांचा आदर्श होता . येणाऱ्या काळात भारताला टिकाव धरायचा असेल तर सेवेची कास धरावी लागेल असे ते सांगत . 
     स्वामीजी अमेरीकेहून परतले . त्यांच्यासोबत मार्गारेट नोबल भारतात आल्या . भारतीयांची सेवा करायच्या अटीवरच त्यांना भारतात यायची अनुमती मिळाली . आपल्या सेवाभावाने नोबलनी स्वामीजींना प्रसन्न करून घेतले . 
     मार्गारेट नोबलचा दीक्षा समारंभ झाला. त्या भगिनी निवेदिता बनल्या . निवेदितेला दीक्षा दिल्यानंतर स्वामीजींनी त्यांना बोलाविले . त्यांच्या हातात काही फुले दिली . ते म्हणाले , ' हि फुले घे . तो बुद्ध दिसतोय ना, त्याच्या पायावर वाहा . त्या महात्म्याने आपले सारे आयुष्य जनता जनार्दनाच्या सेवेसाठी वाहिले होते . ' 

No comments:

Post a Comment