Wednesday, July 24, 2013

८९ . त्यांना उलट वाईटच वाटेल .

                        कथा विवेकानंद - ८९ 

     स्वामीजी भाटे वकिलांकडे राहायला लागले . तरुण असूनही प्रचंड बुद्धिमान असलेल्या या संन्याशाची ओळख आपल्या बंगाली मित्राला करून द्यावी असे त्यांना वाटले . स्वामीजींना घेऊन ते हरिपद मित्रांकडे गेले . 
     श्मश्रू केलेला तेजस्वी संन्याशी, पायात कोल्हापुरी वहाणा, भगवी कफनी, डोक्याला फेटा असा देखणा युवक हरीपदांना क्षणभर भुरळच  पडली . ' साधू म्हणजे निश्चित काहीतरी मागण्यासाठी आलेले असावेत ' असा विचारही मनात येउन गेला . स्वामीजी बंगाली आहेत त्यामुळे महाराष्ट्रीय माणसाच्या घरी त्यांचे जमणे कठीणच . बहुधा याच साठी श्री . भाटे यांनी स्वामीजींना इथे आणले असावे . 
     हरिपदांनी स्वामीजींना विचारले, ' तुमचे सामान इथे आणवून घेऊ का ? ' स्वामीजी उद्गारले, ' सध्या तरी नको . वकिलांच्या घरात मी अगदी आनंदात आहे . आणि घरातील सर्वजण माझ्याशी प्रेमाने, अगदी घरच्यांसारखे वागत आहेत . आपण बंगाली म्हणून मी निघून आलो तर त्यांना उलट वाईटच वाटेल . ' 
     

No comments:

Post a Comment