Tuesday, July 30, 2013

९ २ . धर्माने संतोष निर्मिती होते .

                      कथा विवेकानंद - ९ २ 

     श्री . हरिपद मित्र हे बंगाली गृहस्थ . स्वामीजी आणि ते यांचे ग्रह जुळले . हरिपद स्वामिजींशी अनेकानेक विषयांवर चर्चा करीत . थट्टाविनोद करीत . निकोप चर्चेसाठी शेवटी विचारांचीही तार कुठेतरी जुळावीच लागते . 
     स्वामीजी शरीराने धष्टपुष्ट होते . कमाविलेले शरीर असल्याने खाल्लेले अन्न त्यांना पचे . त्याचा देखणा परिणामही त्यांच्या शरीरावर सर्वांगानी जाणवे . सदा संतुष्ट असल्याने ते विनोदीही होते . 
     हरीपदांनी त्याच्या या शरीरावरून त्यांना एक दिवस छेडलेच . ' संन्याशाचे शरीर का कुठे धष्टपुष्ट असते ? त्याला असे शरीर मिळणे शक्य नाही . ' 
     स्वामीजी उद्गारले, ' माझे शरीर हा माझा दुष्काळ निवारक फंड आहे . आठवडाभर जरी उपवास घडला तरी मला काही होत नाही . माझ्या अंगावर असलेली हि चरबी माझे व्यवस्थित पोषण करते . मला मरू तर ती अजिबात देत नाही . नाहीतर तुम्हा लोकांचे बघा . एकादशीचा एक दिवसाचा उपवास जरी केला तरी दुसऱ्या दिवशी पित्त चढते, चक्कर येते . आख्खे घर डोक्यावर घेता . बरोबर की नाही ?  जो धर्म माणसाच्या ठिकाणी संतोष निर्माण करू शकत नाही तो मुळी धर्मच नव्हे . '

No comments:

Post a Comment